Home अमरावती सभेच्या मैदानावरून अमरावती बच्चू कडू आक्रमक, सभेच्या मैदानातच बच्चू कडू यांचा ठिय्या.

सभेच्या मैदानावरून अमरावती बच्चू कडू आक्रमक, सभेच्या मैदानातच बच्चू कडू यांचा ठिय्या.

41
0

Yuva maratha news

1000313834.jpg

सभेच्या मैदानावरून अमरावती बच्चू कडू आक्रमक, सभेच्या मैदानातच बच्चू कडू यांचा ठिय्या.
___________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती लोकसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमेदवार देण्यात आला आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने अमरावती मधील सभेच्या मैदान बुक करण्यात आले होते. मात्र, त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी मैदानावरच ठीय्या आंदोलन केले आहे. अखेर पोलिसांनीच आता भाजपचे गमचे गळ्यात घेऊन यावे आणि पोलीस भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. अमरावती येथे सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी २४ तारखेला सभेसाठी बुक केले होते. इतकेच नाही तर त्यांचे पैसे देखील भरले होते. मात्र आता या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असून आम्हाला परवानगी दिलेले असताना अमित शहा यांची सभा कशी होईल, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्र असताना देखील पोलीस अधिकारी आम्हाला या सभेला परवानगी देत नाही. तर अमित शहा यांच्या सभेला परवानगी कशी मिळते? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बच्चू कडू यांना विनंती केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी सायन्स स्कोर मैदानावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची चांगली धावपळ झाली. आपण लोकप्रतिनिधी आहात, केंद्रीय गृहमंत्री यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हे मैदान देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी सुरक्षेचा कारणास्तव बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांचा या दाव्याला बच्चू कडू यांनी थेट विरोध केला आहे. आमच्याकडे परवानगी असताना आमची सभा रद्द का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला आहे मग याबाबत गृहमंत्री जर आचारसंहितेचा भंग करत असतील तर काय? आम्ही ५ तारखेला मैदानासाठी अर्ज केला होता. त्यानंतर १८ तारखेला पैसे देखील भरले आहेत. असे असताना देखील आता परवानगी मान्य करायला पोलीस प्रशासन तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री येत असल्यामुळे आम्हाला परवानगी नाकारली जात असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचे काम अमरावती पोलीस करीत आहेत. गृहमंत्री जर आचारसंहितेचा भंग करत असतील तर काय? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आता२६ तारखेपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. उद्याच्या कार्यक्रमात एक लाख कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी दाखल होईल असे बच्चू कडू म्हणाले. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्याचा काही फायदा होणार नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. कायदा शिल्लक नाही, त्यामुळे तक्रार करून काही उपयोग नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तरीदेखील आम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. कायदा शिल्लक नाही, त्यामुळे तक्रार करून काही उपयोग नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तरीदेखील आम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली. उद्या एक लाख कार्यकर्ते यामधून जमा होणार असून सभा झाली नाही तर येथेच एक लाख कार्यकर्ते २६ तारखेपर्यंत ठिय्या देतील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here