आशाताई बच्छाव
व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी
नाशिक जिल्हा परिषदेची चालढकल; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा – राजेंद्र पाटील राऊत
प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क- व-हाणे ता. मालेगाव येथील ग्रामपंचायतीने सन २०२१ साली खोटी व बनावट ग्रामसभा घेऊन शासनाची दिशाभूल केली म्हणून सरपंच अपात्र करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे अपील दाखल करण्यात आले.व त्या अपिलावर दिनांक २९ फेब्रुवारी व ७ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर सुनावणी घेण्यात येऊन,व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी अंतिम निकाल देणे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना आचारसंहितेच्या नावाखाली सदर सरपंच अपात्र प्रकरणाचा निकाल सुमारे पंचेचाळीस दिवसांपासून अडवून ठेवून दप्तर दिरंगाई कायद्यानुसार निकाल देण्याच्या कृतीचा भंग केलेला आहे.त्याशिवाय संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधून सुध्दा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केलेली असल्याने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विरोधात महाराष्ट्राचे लोकायुक्त , विभागीय आयुक्त,व जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागितली जाणार आहे.तर दिनांक १३ जुनं २०२४ पासून याप्रश्नी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व प्रकरणाचे तक्रारदार राजेंद्र पाटील राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.