आशाताई बच्छाव
.
पाठ्यपुस्तके दान करण्यासाठीचे आवाहन –
नाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !
नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):- जिल्ह्यातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने मोफत शालेय पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ह्या उपक्रमात गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा एक हेतू आहे. ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ संपलेल्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय पाठ्यपुस्तके आमच्याकडे मोफत जमा करून ज्ञानदानाचे अनमोल कार्य करावे व नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शैक्षणिक संस्थांना , फाऊंडेशनना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी मदत करावी असे आवाहन स़ंस्था अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत व सचिव आशाताई बच्छाव यांनी केले आहे. सध्याची वाढती महागाई बघता सध्याच्या शैक्षणिक खर्च हा त्या गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना असाह्य आहे व शालेय गणवेश, वह्या , मार्गदर्शक तसेच नवनीत व्यवसाय ह्या सर्व गोष्टी प्रत्येकी १०००/- रूपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले आहे. आणि हीच खरी आदरांजली महाराष्ट्राचे आराध्यदैवत व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिक्षणाचे महामेरू परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना राहील. असे राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.
पत्ता :- आश्रयआशा फाऊंडेशन कार्यालय मु.व-हाणे पो.सोनज ता.मालेगाव जि.नाशिक
संपर्क क्रमांक:- ९८५०४४७६८५/९६८९५१९०९४ किंवा इमेल आयडी:- yuvamarathanews2003@gmail.com
व ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे त्यांनीही आपली नावनोंदणी करावी. आमच्याकडे पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ते विद्यार्थ्यांना देऊ. असे आश्वासन दिले आहे.