आशाताई बच्छाव
राहुरी (दिपक कदम तालुका प्रतिनिधी ) एकलव्य संघटना अहमदनगर जिल्हा यांचे वतीने राहुरी तालुका पोलीस निरीक्षक व तहसीलदार राहुरी यांना एकलव्य जयंती निमित्त निवेदन देण्यात आले व आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्ते यांनी गाव गाव जाऊन जनतेशी संवाद साधत समस्या जाणून घेऊन त्या एकलव्य संघटना अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने सोडविणे यासाठी काम करण्याच्या सूचना तालुका पद अधिकारि यांना देण्यात आल्या त्या नंतर नगर लोकसभा निवडणुकीत राहुरी तालुक्यांतील आदिवासी महत्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे कार्यकर्ते यांनी काम करावे लागणार आहे असेही मत जिल्हा अध्यक्ष गीताराम बर्डे यांनी व्यक्त केले यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष किरणं माळी, जिल्हा उप प्रमुख विशाल बर्डे
तालुका प्रमुख विजय सुर्यवंशी, उप प्रमुख माऊली जाधव, कार्य अध्यक्ष नाना शिंदे उप अशोक पवार, संघटक सुरेश जाधव, भानुदास बर्डे कृषभ जाधव अनिल माळी प्रवीण जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.