Home सामाजिक अपेक्षा **************************

अपेक्षा **************************

290
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_080157.jpg

अपेक्षा
**************************
या पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस, मुके प्राणी, जीवजंतू, झाडे, झुडपे जन्माला येतात आणि एक दिवस ह्या जगाचा निरोप घेतात. हा निसर्गाचा नियमच आहे. तो आजपर्यंत कोणालाही चुकला नाही आणि कधीच चुकणारही नाही.कारण, निसर्ग जिकडे- तिकडे पसरलेला आहे.तो सर्वांकडेच बघत असतो. म्हणून त्याची बरोबरी करण्याच्या भानगडीत आपण पडू नये. जमत असेल तर त्याच्या नियमांचे पालन करायला शिकले पाहिजे. तेही आपल्यावर अवलंबून आहे. जसे पालन केले तसे सुखही भोगता येईल. न पालन केल्यास दु:खाच्या पंक्तीत बसण्याची आपोआप वेळ येईल. त्याबाबतीत फक्त आपणच ठरवावे.असो, माणूस म्हटल्यावर प्रत्येक माणसाला काही ना काही लहान, मोठ्या अपेक्षा असतात. पण म्हणतात ना की जास्त अपेक्षा करू नये.दु:खाचे कारण आपण स्वतःच असतो.हे सर्व ठीक आहे.पण, याच समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या खूप मोठ्या नाहीत पण लहान-सहान अपेक्षा असतातच.त्या अपेक्षा पूर्ण व्हायला नकोत का? पण, तसं काहीही होताना दिसून येत नाही. कारण, आताच्या सध्याच्या परिस्थितीत बघितले तर बदलेले चित्र सर्वत्र दिसत आहे. जसे गोरगरीबांच्या अपेक्षा, बळीराजाच्या अपेक्षा, विधवा भगिणींच्या अपेक्षा , भटक्या जमातीच्या अपेक्षा , दिव्यांग बांधवांच्या अपेक्षा , ज्या गावात आजपर्यंत कधीच एसटी बस गेली नाही त्या गावकरी लोकांच्या अपेक्षा, रस्त्यावर पडलेले मोठे-मोठे खड्डे पाहून थकलेल्या लोकांच्या अपेक्षा, आदिवासींच्या अपेक्षा, ज्या गावात विद्यार्थ्यांसाठी धड शाळा नाहीत अशा शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, काही ठिकाणी पाण्यासाठी कोसोदूर जाऊन पाणी आणावे लागते.पाण्याचा दुष्काळ कधी संपेल ही अपेक्षा, काही ठिकाणी आरोग्यासाठी वेळेवर सुविधा पोहचत नाही, कधी सोय लाभणार ही अपेक्षा, काही ठिकाणी नदी, नाल्यावर अजूनही पुल बांधलेले नाहीत त्याची अपेक्षा, एक भारी समस्या, कुठे हाताला रोजगार नाही. एवढेच नाही तर..काही गावात विजेचा लपंडाव असतो वीजपुरवठा मिळावी ही अपेक्षा. अशा कितीतरी अपेक्षा सर्व सामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेल्या आहेत.
पण, शोकांतिकाच म्हणावे लागेल की, त्यांच्याकडे कोणीही काळजीपूर्वक लक्ष देत नाही. त्यामुळे सामान्य लोकांच्या अपेक्षांची जिवंतपणीच अंतयात्रा निघत आहे.
त्याच प्रमाणे याच समाजामध्ये राहणाऱ्या लोकांकडे गाडी, बंगला, अफाट धनसंपत्ती, पैसा असताना सुद्धा पुन्हा आपल्याला अजून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा ठेवून आवाज उठवतात आणि वेळ आल्यावर लगेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात. पण, ह्या समाजात राहणाऱ्या इतर लोकांच्या अपेक्षांचे काय? त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण होतील? का म्हणून त्यांच्या अपेक्षांची अंतयात्रा निघत असते? का म्हणून शासनाला त्यांचे हाल दिसत नाही?असे अनेक प्रश्न अनेकांच्या मुखातून बाहेर पडताना दिसत आहेत. आज बघितले तर..बळीराजाच्या जीवनात आनंद कमी पण अडचणी अधिक दिसून येत आहेत. पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यासाठी त्याला आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तो,जगाचा पोशिंदा आहे कोणाचा नौकर, चाकर, गुलाम नाही आणि त्याला गुलाम बणविण्याची कोणाची ताकदही नाही. त्याला कोणीही जिंकू शकत नाही. पण, प्रश्न हा आहे की, त्याला कोणीही मदत करत नाही.
त्यामुळे आज तो गळफासात अडकत आहे ह्याला जबाबदार कोण? जरा विचार करा. जिवंतपणी त्याच्याही काही अपेक्षा असतील, त्यालाही इतरांसारखे जगायचे असेल ह्या विषयी कोणी बोलतच नाही.त्याच प्रमाणे बळीराजासारखे या समाजात असे कितीतरी रंजले, गांजले लोक आहेत. त्यांचा कोणीही वाली दिसत नाही. त्यांच्याही काही अपेक्षा असतील त्याही पूर्ण होत नाही. कारण आजचा जमाना सत्याचा नाही तर खोट्याचा आहे.ज्यांच्याकडून खायला भेटते त्यांच्याकडे धाव घेतात व त्यांनाच जोमाने साथ देतात.ज्यांच्याकडे काहीच नसते त्याला कोणीही विचारत नाही. म्हणूनच याच समाजात राहणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या अपेक्षांची जिवंतपणीच अंतयात्रा निघत आहे.वास्तव आहे. आपण नाकारू शकत नाही.या पृथ्वीतलावर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. पण,सर्व सामान्य लोकांच्या मनातील अपेक्षा काही वाचाळवीर लोकांमुळे पूर्ण होत नसतील तर त्यांनी कोणाकडे धाव घ्यावी?या विषयी शासनाने एकदा तरी विचार करून बघायला पाहिजे. कारण या भारतभूमीमध्ये जेवढे लोक जन्माला आलेले आहेत ते सर्व लेकरे भारत मातेचे व होऊन गेलेल्या सर्व महान विभूतींचे लेकरे आहेत हे विसरता कामा नये.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleजिजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर १४२ विध्यार्थी दिले (आय.ए.एस.) श्रेयाची परीक्षा
Next articleशतकवीर रक्तदाता सुरेश रेवणकर यांचे रक्तदानाच महान कार्य ऐकून अनेकांनी केले रक्तदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here