आशाताई बच्छाव
उद्धव ठाकरे यांना ‘खंबीर योद्धा’ पुरस्कार
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम तालुका प्रतिनिधी) ः उद्धव ठाकरे यांच्या श्रीरामपूर येथे आयोजित सभेच्यावेळी राहुल गांधी विचार मंच व ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने ‘खंबीर योद्धा’ अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
दि.१३ रोजी सायंकाळी श्रीरामपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच जातीसलोखा राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कोरोना काळात कोणत्याही गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले. तसेच ‘आपले कुटुंब आपली जबाबदारी’ हा महत्त्वाचा नारा देवून समाजातील लोकांना कोरोना काळात कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. या त्यांच्या चांगल्या निर्णयाबद्दल व मुख्यमंत्रीपदाच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना श्रीरामपुरातील राहुल गांधी विचार मंच व महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, सचिन बडधे, शेखर दुबैय्या, संजय साळवे, सचिन जगताप, सचिन गुजर, अविनाश काळे, भाऊसाहेब तोरणे, दिपक कदम, नितीन जाधव, प्रमोद संसारे, रविंद्र लोंढ, अविनाश काळे, सुरेश ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.