Home सामाजिक प्रेम म्हणजे काय? **************************

प्रेम म्हणजे काय? **************************

193
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240205_195451.jpg

प्रेम म्हणजे काय?
**************************
प्रेम हा शब्द कानावर पडताच प्रत्येकाच्या चेह-यावरील भाव बदलतात.एक वेगळाच भाव चेहऱ्यावर झळकू लागतो.चेहरा आनंदी दिसू लागतो.डोळ्यात पाहणा-याला समोरच्याच्या डोळ्यात अनोखी चमक दिसू लागते.सर्वांनाच बहुदा प्रेम या विषयावर बोलायला आवडतं.प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या निराळी असते कारण प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो.प्रेमाकडे कोण कुठल्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो यावर प्रेमाची व्याख्या अवलंबून असते
प्रेम फक्त व्यक्तीसोबतच असते असे नाही, तर ते एखाद्या वस्तूवर,प्राण्यावर देखील होत असते.प्रेम म्हटले की सर्वप्रथम आठवण येते ती राधा आणि कृष्ण यांची.राधा-कृष्णाप्रमाणे अगदी नि: स्वार्थी,निर्मळ आपलं प्रेम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं.प्रेम म्हणजे नि: स्वार्थ भावनेने आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा काही प्रमाणात का असेना त्याग करणे.प्रेम जीवन देतं, जीवन घेत नाही.तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे समोरच्याने स्वीकारणे म्हणजे खरे प्रेम.प्रेम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारं असलं पाहिजे.कितीही संकटे आली तरी मागे न फिरणारं.प्रेम एक पवित्र भावना आहे.जगात नि:स्वार्थी प्रेम मिळणे खूप कठीण आहे.
आई- वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम,मुलांचे आई-वडिलांवरील प्रेम,भावा-बहिणीचे प्रेम,मुक्या प्राण्यांचे प्रेम हे नि: स्वार्थी प्रेमाचे प्रतीक आहे.नि: स्वार्थ प्रेमासोबतच निरागस प्रेमही हवे.
विश्वास,आदर, आपुलकी, सहानुभूती, काळजी इत्यादी भावनांच्या मिश्रणाने तयार होणारे प्रेम म्हणजे निरागस प्रेम.या जगात प्रत्येकालाच प्रेम हवं असतं.प्रेमाशिवाय जगणे कठीण आहे.एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या नात्यांमुळे जीवन सुखकर होतं.
**************************
 

Previous articleजेल भरो आंदोलनातून अशा सेविकांनी केला शासनाचा निषेध.
Next articleरांजणीत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून आयोजन :  युवा खेळाडूंचा मोठा प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here