Home बीड मागण्या मान्य होताच परळी शहरात मराठा समाजाचा जल्लोष; पेढे भरवत चौकाचौकात फटाके...

मागण्या मान्य होताच परळी शहरात मराठा समाजाचा जल्लोष; पेढे भरवत चौकाचौकात फटाके फोडत केली दिवाळी साजरी

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_080427.jpg

मागण्या मान्य होताच परळी शहरात मराठा समाजाचा जल्लोष; पेढे भरवत चौकाचौकात फटाके फोडत केली दिवाळी साजरी

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:२७ राज्य शासनाने मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून जल्लोष सुरू आहे. आज शनिवार सकाळपासूनच शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक, तळ परीसर नेहरू चौक, गणेशपार चौक, देशमुखपार चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह मराठा समाजाच्या घराघरात दुकानांसमोर फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली आहे. काल मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारच्या या याबाबत मराठा आंदोलकांशी चर्चा केली. सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेने केली. दरम्यान राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून रात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्याचच्या मुद्द्यांचाही समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे मराठा समाजाला मोठ्या यश आले आहे. याचा आनंद उत्सव परळी शहरांमध्ये मराठा समाजाच्या घरोघरी दुकानासमोर शहरातील सर्व मुख्य चौकात करण्यात आला. पेढे भरवत फटाक्यांची आतिशीबाजी करत आरक्षणाच्या लढ्याची विजय दिवाळी साजरी केली. यावेळी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजासह मनोज जरांगे पाटील यांच्या नावाच्या विजयी घोषणा केल्या.

Previous articleचित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कला गौरव पुरस्कार प्रदान
Next articleकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here