आशाताई बच्छाव
नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देगलूर-बिलोलीच्या आमदारांना पडली गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चिंता.
देगलूर तालुका प्रमुख,(गजानन शिंदे)
हिवाळी अधिवेशनात देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार हे तांराकित प्रश्नात देगलूर बिलोली मतदारसंघातील आपल्या मतदारसंघातील आडी अडचणी सोडविण्यापेक्षा तारांकित प्रश्नांमध्ये गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत असुन, गडचिरोली आपला मतदारसंघ नसुन देगलूर बिलोलीच्या जनतेने आपल्याला निवडणूक दिलं असुन देगलूर बिलोली मतदारसंघातील प्रामुख्याने असलेल्या लेंडी धरना विषयावर, नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गावर,एम आय डि सी च्या वाढिव जागेवर, शेतकर्यांचे दुष्काळावर, अनुदान वर, कर्जमाफी वर, नवीन रस्तावर, नवीन शासकीय वैद्यकीय कॉलेज, मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, देगलूर बसस्थानकातील बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखानाच्या विकासासाठी,लिंगनकेरूर येथिल तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी,होट्टल येरगी तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, वैद्यकीय उपचारासाठी लागणारं नवीन तंत्रज्ञानासाठी उच्च शिक्षणासाठी असे अनेक प्रश्न देगलूर बिलोली मतदारसंघात असताना सन्मानिय आमदार महोदयांनी थेट सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गडचिरोली मतदारसंघांतील राईस मिल मधील गैर व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी, नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांमध्ये केली,हेच देगलूर बिलोली मतदारसंघाच्या जनतेवर प्रेम आहे का आमदार साहेब असे प्रश्न देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी आमदार महोदयांकडे केली…






