Home अमरावती पत्रकार सन्माननीय संजय बापू देशमुख यांना स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार.

पत्रकार सन्माननीय संजय बापू देशमुख यांना स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20231211_083948.jpg

पत्रकार सन्माननीय संजय बापू देशमुख यांना स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार.
————
दैनिक युवा मराठा_.
पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती/(अकोला).
अकोला येथील लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ३५ वर्षापासून सामाजिक, राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री संजय बापू एम देशमुख (लिंबेकर अकोला) यांचे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या संस्थेचा २०२४ आम्ही विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत या संस्थेने अकोला व वाशिम जिल्ह्यात १०३ वाचनालयाची स्थापना करून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना लाखो पुस्तके वितरित केले आहे. समाजात युवकांमध्ये प्रबोधन आणि जागृती चे कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्षप्रा. राजेश टाले आहे. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन हे स्वामी विवेकानंद यांच्या वैश्विक क्रांतीच्या परिवर्तनवादी सत्याच्या दिशेने कार्य करणारी संस्था असून मनोविकासातून सामाजिक विकास साधून परिवर्तन घडविण्यासाठी वचन चळवळ आणि सामाजिक साधून विकास साधून परिवर्तन वाचन चळवळ मध्ये प्रबोधन व जागृतीच्या कार्यात सक्रिय असलेली संस्था आहे समाजात वाचन चळवळ घेण्यासाठी अनेक गावांना पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचा या संस्थेने व या संस्थेचे अध्यक्षप्रा. राजेश टाले आणि सहकाऱ्यांचा मनोदय आहे. या अभियानात प्रथम त्यांच्या अकोला जिल्ह्यातील माजोर गावाला देशातील आणि महाराष्ट्रातील पुस्तकाचे दुसरे गाव निर्माण करण्याच्या काम कामात सध्या ते सक्रिय आहेत. अशा अभिनव घेण्याच्या संकल्पना घेऊन चालणाऱ्या या संस्थेने श्री संजय बापू देशमुख यांच्या बाळापुर तालुक्यातील निंबा येथील सामाजिक कार्याचा शुभारंभ आणि तेथील उपसरपंच, त्यापूर्वी शिक्षण महर्षी, पद्मश्री, माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे शिवसचिव म्हणून पार पडलेली प्रशासकीय आणि सामाजिक सेवेचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ या अकोला येथे स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे सुरू असलेले पत्रकार कल्याणकारी आणि सामाजिक उपक्रमाचे मूल्य पण करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संजय देशमुख हे पत्रकार महासंघासोबतच सध्या देशात भरातील सर्व भाषिक वृत्तपत्राच्या संपादक, प्रकाशकांच्या इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (ईला ना) या संघटनेचे राष्ट्रीय सचिव असून महाराष्ट्रातील लोकनेते व दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री प्रकाशभाऊ खोरे हे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. संजू बापू देशमुख हे विश्व प्रभात वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. अकोला जिल्हा मुद्रक संघ, मानव धर्म नागरी सहकारी पतसंस्था, अकोला जिल्हा देशमुख सहज सेवा मंडळ अशा विविध संस्था, संघटनेच्या माध्यमातून सध्या कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here