आशाताई बच्छाव
महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती. -मुंबई ५ डिसेंबरला पासून विशेष रेल्वे अमरावतीहुन मुंबईला सुटणार.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती विभागीयसंपादक
अमरावती.
प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने अमरावती ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ५ डिसेंबर२०२३ रोजी अमरावती रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना होईल, तर ७ डिसेंबर२०२३ रोजी मुंबई येथून अमरावती परत येणार आहे . अमरावती-मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०१२२१८ ही ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून ५ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२१७ ही गाडी ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२ वाजून ४० मिनिटांनी वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला ,शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे. एकूण या गाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहे. या विशेष गाडीने प्रवास सुखकर व्हावा आणि प्रवास दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांनी वैद्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आव्हान भुसावळ रेल्वे जलसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.