Home जळगाव मुक्ताईनगर मतदार संघातील १० मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर; शेतकऱ्यांनी आ. चंद्रकांत...

मुक्ताईनगर मतदार संघातील १० मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर; शेतकऱ्यांनी आ. चंद्रकांत पाटलांचे मानले आभार !

93
0

आशाताई बच्छाव

IMG_20231121_063233.jpg

मुक्ताईनगर मतदार संघातील १० मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर; शेतकऱ्यांनी आ. चंद्रकांत पाटलांचे मानले आभार !

विभागीय संपादक, योगेश पाटील, जळगाव.

महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच सरकार द्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ योजना जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा निकषात मोठा बदल करून ९५९ महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात करण्यात आला त्यामुळे दुष्काळी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याचेच फलीत म्हणून मतदार संघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीनही तालुक्यातील १० महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. यात केवळ कुन्हा मंडळ सुटलेले असून या महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने खालील महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे !

१) खिर्डी बु. ता. रावेर
२) निंभोरा बु. ता. रावेर
३) मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर
४) अंतुर्ली ता. मुक्ताईनगर
५) घोडसगाव ता. मुक्ताईनगर
६) बोदवड ता. बोदवड
(७) करंजी ता. बोदवड
८) सावदा ता. रावेर
९) ऐनपुर ता. रावेर
१०) नाडगाव ता. बोदवड

गेल्या ३० ते ४० वर्षांत अस्मानी व तुफानी सुलतानी संकटे झेलून देखील रावेर तालुक्यातील ऐनपुर महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर होत नव्हती. यंदा आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने पहिल्यांदा नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळ महसूल मंडळांच्या यादीत तसेच शासनाच्या परिपत्रकात ऐनपुर महसूली मंडळाचा समावेश झाला असून आता या महसूली मंडळातील शेतकरी बांधवांना नुकसानी खऱ्या अर्थाने अनुदान व इतर मदतीचे लाभ घेता येणार आहे.

१) जमीन महसुलात सूट
२) सहकारी कर्जाचे पुनर्गठण
३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
४) कृषी पंपाच्या चालू वीस बिलात ३३.५% सूट
५) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर चा वापर
८) टंचाई जाहीर झालं केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.
आदी सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here