आशाताई बच्छाव
युद्ध नको ,बुद्ध हवा :-गायक तनुजा नागदेवे
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) बुद्ध धम्म हा मानवतेवर प्रेम, करुनेवर धम्म आधारीत असून बौद्ध धम्म कल्याणकारी धम्म आहे आणि म्हणूनच या धम्माचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्म स्वीकारला म्हणून बौद्ध धम्म ओळखला जातो
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणाकरिता बौद्ध धम्म दिला तो धम्म सर्व बौद्ध बांधवांनी अंगिकरावा व धम्माचे आचरण करावे आणि ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा आचरणामध्ये आणावे त्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार होईल आणि आपला देश एका उज्वल भविष्याकडे वाटचाल करेल समाज वाटचाल करेल समाजामध्ये परिवर्तन घडविणे असे मत संगीतमय कार्यक्रमात प्रबोधनकार तनुजा अमित नागदेवे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील गोपाळटोली या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनातून मत व्यक्त केले याप्रसंगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले ,माजी खासदार खुशाल बोपचे यांनी गायक तनुजा नागदेवे यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्या स्वतः त्यांनी तनुजा नागदेवे यांचे गीत प्रत्यक्ष बसून ऐकून घेतले व मंत्रमुग्ध झाले व इतर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते वसंता राऊत, अमित नागदेवे, समिर गोंडाणे, संदेश राऊत, ज्योती घरडे व इतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत संगीतमय ताल देत होते हे विशेष