Home जळगाव भाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता...

भाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0039.jpg

भाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान
चाळीसगाव,प्रतिनिधी विजय पाटील
भाजपा जळगाव महानगरच्या वतीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पखवड़ा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने स्वच्छता अभियान जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी युवा खासदार उन्मेशदादा पाटील, जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे( राजूमामा), माजी आमदार स्मिताताई वाघ,जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर, महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा क्षेत्र प्रमूख डॉ.राधेश्याम चौधरी , युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशन परिसरात मान्यवरांनी स्वच्छता करीत परिसर झाडून काढला.याप्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, स्वच्छता अभियानाचे प्रमुख राहुल वाघ, महिला प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleतालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा देवळी येथे संपन्न….
Next articleनाशिकमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित प्रसाद वाटप व दुवा पठण संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here