Home जालना जालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव

जालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0057.jpg

जालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव
जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी नागरी समस्येवरून केली प्रश्नांची सरबत्ती,
आयुक्त झाले निरुत्तर
जालना, दि. २०(ब्युरो चीफ दिलीप बोंडे)-जालना शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता,
दिवाबत्ती आदी नागरी प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या
नेतृत्वात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना प्रचंड
घोषणाबाजी करीत घेरावा घालण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, बाबुराव पवार, युवासेनेचे भरत
सांबरे, जिल्हा युवाअधिकारी शिवाजी शेजुळ, शहरप्रमुख बाला परदेशी,
घनश्याम खाकीवाले, महीला आघाडी जिल्हासंघटक मंगल मेटकर, गंगुताई वानखेडे,
मंजुषा घायाळ, यांची उपस्थिती होती. यापूर्वीही शिवसेनेच्या वतीने
कन्हैयानगर येथील रस्त्यासाठी तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांना घेराओ
आंदोलन करून सदरील रस्ता दुरुस्तीची मागणी केली, जालना शहरातील खराब
रस्ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी नूतन वसाहत रस्त्यावर खड्डे मोजून
त्यांचे नामकरण करण्याचे अनोखे आंदोलन केले.
तसेच दीड वर्ष बंद असलेली मूर्ती वेस सुरु व्हावी यासाठी शिवसेनेच्या
वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर द्वारसभा आंदोलन केले. यानंतरच
प्रश्नांवर पालिकेने कारवाई केली. आंदोलना शिवाय कारवाई न करणार्‍या
पालिकेवर शहारातील नागरी प्रश्न घेऊन आयुक्तांना घेराव आंदोलन करुन
त्यांचे लक्ष वेधले. यावेळी नागरी समस्या मांडतांना जिल्हाप्रमुख अंबेकर
म्हणाले की, जालना शहरातील नागरी समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य
दुर्लक्ष होत आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन .           
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. वंदना खांडेभराड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here