आशाताई बच्छाव
जालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव
जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी नागरी समस्येवरून केली प्रश्नांची सरबत्ती,
आयुक्त झाले निरुत्तर
जालना, दि. २०(ब्युरो चीफ दिलीप बोंडे)-जालना शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता,
दिवाबत्ती आदी नागरी प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या
नेतृत्वात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना प्रचंड
घोषणाबाजी करीत घेरावा घालण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, बाबुराव पवार, युवासेनेचे भरत
सांबरे, जिल्हा युवाअधिकारी शिवाजी शेजुळ, शहरप्रमुख बाला परदेशी,
घनश्याम खाकीवाले, महीला आघाडी जिल्हासंघटक मंगल मेटकर, गंगुताई वानखेडे,
मंजुषा घायाळ, यांची उपस्थिती होती. यापूर्वीही शिवसेनेच्या वतीने
कन्हैयानगर येथील रस्त्यासाठी तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांना घेराओ
आंदोलन करून सदरील रस्ता दुरुस्तीची मागणी केली, जालना शहरातील खराब
रस्ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी नूतन वसाहत रस्त्यावर खड्डे मोजून
त्यांचे नामकरण करण्याचे अनोखे आंदोलन केले.
तसेच दीड वर्ष बंद असलेली मूर्ती वेस सुरु व्हावी यासाठी शिवसेनेच्या
वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर द्वारसभा आंदोलन केले. यानंतरच
प्रश्नांवर पालिकेने कारवाई केली. आंदोलना शिवाय कारवाई न करणार्या
पालिकेवर शहारातील नागरी प्रश्न घेऊन आयुक्तांना घेराव आंदोलन करुन
त्यांचे लक्ष वेधले. यावेळी नागरी समस्या मांडतांना जिल्हाप्रमुख अंबेकर
म्हणाले की, जालना शहरातील नागरी समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य
दुर्लक्ष होत आहे.