Home उतर महाराष्ट्र मोठी बातमी : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य

मोठी बातमी : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य

493
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20230910-143751_Google.jpg

मोठी बातमी : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य
अहमदनगर,(प्रतिनिधी कारभारी गव्हाणे)-
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या कोपर्डी हत्याकांड प्रकरणासंबंधी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहातील बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
या अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज म्हणजेच रविवार( 10 सप्टेंबर) ला सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जेल प्रशासन हादरुन गेले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान शिक्षा भोगत असतानाच आरोपीने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Previous articleव-हाणे प्रकरणात अखेर सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल;पुढील कार्यवाहीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
Next articleखासदार समर्थक प्रदीप पाटील फाजगे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह शेकाप मध्ये जाहीर प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here