आशाताई बच्छाव
सटाणा प्रतिनिधी (जगदिश बधान )- राज्य सरकारने कांद्याला जाहिर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व कॅबिनेट मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व कॅबिनेट मंत्री ना.छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साकडे घातले.
दि. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्यास शासनाने अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर उत्पादित कांदा पिकाची नोंद झालेली नसल्याने मोठया प्रमाणात शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याचे शक्यता आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करून कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करावे अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो ओळी – कांद्याला जाहिर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे साकडे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना घालतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार.