आशाताई बच्छाव
जगणं कोणासाठी…..?
हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
या दुनियेत असा एकही मनुष्य नाहीं , ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय, आपण तर साधारण मनुष्य आहो ! सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं कांहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच ,जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हां जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे,
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हां स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खुप कांही शिल्लक आहे. खुप माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे,असं फक्त आपल्याला वाटत असतं.
सर्वात सुखी माणूस तोच आहे, जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे, जो आपली तुलना इतरांशी करतो.
आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.
कृतज्ञ रहा ,कारण तुमच्याकडे जे कांही आहे,ती फक्त ईश्वरी कृपा आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाहीं आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाहीं. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
वय आणि पैसा यावर कधीही गर्व करु नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याचं नांव आहे, “आत्मविश्वास”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा, ती व्यक्ती चांगली आहे, म्हणून नव्हे तर तुम्हीं चांगले आहात म्हणून ! कोणी आपले वाईट चिंतले, तरीही त्या व्यक्तीचे तुम्हीं वाईट चिंतु नका. आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका. दुसऱ्याचे अजिबात वाईट चिंतु नका. दुसऱ्यांच्या दु:खाकडे न हसता, त्यांच्याकडे मायेची फुंकर घाला. जीवनात. सकारात्मक दुष्टीकोन बाळगा..
✍🏻✍🏻स्वप्निल देशमुख,(पत्रकार)
बुलढाणा जिल्हाध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा ब्यूरो चिफ- दै.युवा मराठा-