
राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा न्युजचा मोठ्ठा दणका संग्रामपूरचे वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी..
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख बुलढाणा
संग्रामपुर:- येथील वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरणगावकर यांचा माहूर पासून वादग्रस्त प्रवास ठरलेला आहे, मनस्ताप देणाऱ्या तहसीलदाराची बदली करा नाहीतर अनुचित प्रकार घडू शकतो. असे नांदेडच्या तलाठी संघटनेने इशारा दिला होता. माहूर तहसील ला तहसीलदार म्हणून सिद्धेश्वर वरणगावकर असताना सुद्धा तेथील सामान्य नागरिकांपासून तर सर्व कर्मचारी अधिकारी हे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हुकूमशाहीला व मनमानीला वैतागले होते. जवळपास सहा वर्षापासून सिद्धेश्वर वरणगावकर हे माहूर तहसीलदार पदावर पदावर ठाण मांडुन बसले होते तसेच तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या पासुन मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या अनेक तक्रारीनंतर तहसीलदार वरणगावकर यांची माहूर येथून संग्रामपूर येथे बदली झाली परंतु ठिकाण जरी बदलले तरी त्यांचा खुंशी स्वभाव हा सोबतच असल्याने संग्रामपूर तालुक्यामध्ये सुध्दा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भरपावसात आंदोलन केले होते
तहसीलदार तलाठ्यांना असभ्य वागणुक देत होते आठवडाभर संग्रामपुर तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी रजेवर गेले होते तहसीलदारवर कारवाई न इााल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा उपविभागातील तलाठी, मंडऴ अधिकारी, आपल्याकडील साहित्य डीएससी कार्यालयात जमा करतील तसेच निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे काम वगळून इतर कामांवर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला होता . तहसीलदार वरणगावकर यांच्या मनमानीची बातमी प्रसिद्ध केल्यास तहसीलदार वरणगावकर हे पत्रकारांना पण खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असत. जवळपास फक्त रेती रेतीमाफी यांनाच त्यांचे पाठबळ मिळत होते त्यामुळे तालुकाभर अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे आता येणाऱ्या नवीन तहसीलदार श्री योगेश्वर टोपे यांना मात्र अवैद्य रेती वाहतुकीवर आळा बसवण्यासाठी फार कसरत करावी लागेल येणाऱ्या काळात नवीन तहसीलदार यांच्याकडून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळेल व अवैद्य रेतीला आळा बसेल अशी सर्वसामान्यांमध्ये आशेचे किरण दिसून येत आहे .