आशाताई बच्छाव
जळगांव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुल धारक मागील १२ वर्षापासून मुलभूत सुविधापासून (पाणी, वीज, रस्ते) वंचित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जनहित) व मन्यारखेडा ग्रामस्थ
जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
जळगांव :- जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण हे गाव मागील १२ वर्षापासून त्याठिकाणी बसलेले असून सदरील तेथे बहुतेक करुन आदिवासी समाजाचे लोक असून त्याठिकाणी ग्रामस्थ मागील १२ वर्षापासून राहत असून आज रोजी ते मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
तरी सुस्त प्रशासनाला जाग येणेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जनहित), अंगीकृत संघटना तसेच मन्यारखेडा गावठाण भागातील ग्रामस्थ दिनांक ५/६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढून आपले निवेदन सादर करणार आहे.
तरी सदरील मोर्चाला सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आजी, माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व सर्व अंगीकृत संघटना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( जनहित ) राजेंद्र निकम यांनी केलेले आहे.