आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा .डॉ. भारती पवार
डॉक्टर किसान ॲपचे उद्घाटन, गुणवंतांचा सन्मान
प्रतिनिधी .प्रवीण अहिरराव. युवा मराठा न्यूज
शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो ,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले, डॉक्टर किसान मोबाईल एप्लीकेशनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारती पवार बोलत होत्या.
यावेळी आ. राहुल ढिकले, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, संचालिका साधना जाधव, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक रवींद्र निमसे, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, प्रा. डॉ. संजय जाधव, नरेश पाटील ,बापूसाहेब शिंदे, दत्ता खेमनर उपस्थित होते. डॉक्टर किसान ॲप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले. आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील म्हणाले की, शासन निधी देत असते त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे. पाणी स्वच्छता शिक्षण आणि निराधार लोकांना मदत करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहू नये ,असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील दिंडे यांनी प्रास्ताविकाद्वारे ॲप आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमांतर्गत, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचा, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कृषीभूषण, सहकार, कृषिरत्न, समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सुनील दिंडे, डॉक्टर किसान रिसर्च इन्स्टिट्यूटचे सह संस्थापक व संचालक सागर पवार ,आणि प्रशांत दिंडे, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर पवार यांनी आभार मानले.