आशाताई बच्छाव
चेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात बंदिस्त गटारीचे चेंबर फुटल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी चालणे अवघड होत आहे. तसेच या खराब पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना डास, मच्छर यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. काही ठिकाणी साथरोग पसरतील की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्याय अत्याचार निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गटारीचे त्वरित सुधारणा करावी अन्यथा याबाबत तीव्र प्रतिक्रिया ग्रामपंचायतीसमोर बघावयास मिळतील. यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती बागलाण तालुकाध्यक्ष संदीप गांगुर्डे, शरद जगताप, विशाल चव्हाण, राजेंद्र लोंढे, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.