आशाताई बच्छाव
चर्चेतला वाघ…म्हणे बंदुकीच्या धाकावर जवाब नोंदवले : संजय राऊत.! राज्यातील तपास यंत्रणा येउडी पण मोकाट नाही कोणालाही गनपॉइंट वर ठे
(मुंबई : जिल्हा प्रतिनिधी, अंकुश पवार, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)
कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊतांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. सध्या आर्थर रोड जेलमधील कारागृहात संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यात संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी कोर्टाच्या बाकड्यावर हे पत्र लिहीत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
त्या पत्रात अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी ईडीविरोधात केला आहे. या आरोपांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“ईडी, प्राप्तिकर विभागाच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभं राहायला हवं. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत तू आणि बाळासाहेबांनीच मला दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत,” असं संजय राऊतांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
संजय राऊत साहेब राज्यातील जनता येऊडी पण लहान राहिलेली माझे किथकी तुम्ही राजकारणी लोक समजता, सद्याची तरुण पिढी अही फक्त टाईमपास म्हणून आपल्याकडे पाहत आहेत. फक्त तुम्ही,तुम्ही तरुण मुल,नातेवाईक आता तुमचा सोबत नगरसेवक,आमदार,खासदार झालेत प्रत्येकाने युवा सेना,कामगार सेना, विद्यार्थी सेना कडल्या आहेत त्यामुळे तुम्हाला गैरसमज आला आहे की तरुण तुमचा सोबत आहे पण फक्त २५ ते ५० चा जुना वर्ग अलीकडील काही स्वार्थ साठी एकत्र अपलेले लोक तुमचा सोबत आहेत त्यांचा बळावर तुम्ही निर्धास्त आहात. जरा विचार करा आपल्याला अटक झाली कोणाचे ही योगदान असो,कारस्थान असो गेल्या निवडणुकीत तुम्ही रोज सकाळी शुभ सकाळ सारखे टीव्ही वर यायचात परंतु तुम्ही आता संकटात असता तुम्हाला बाहेर काढायला कोणी उत्साह दाखवत नाही. त्यामुळे तपास यंत्रणा वर टीका करणे चुकीचे आहे.
या वर्ष खासदार नवनीत राणा,रवी राणा यांना अटक केली पोलिस यांनी आवाज चडवला तर ४ दिवस टीव्ही वर प्रकरण गाजत hoth तुम्ही खासदार असताना पण तुम्ही हा अन्याय का सहन करता तुमची ताकत आता राहिली नाही का..? खरंच तुमच्या वर गनपॉइंट वर जबाब नोंदविले अस्तेल तर तुम्ही जबाब दिले का..? नसतील दिले तर योग्य ती कारवाई करा त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही खासदार असून जनतेकडे तक्रार कसली करता, की तुम्हाला पण सत्य परिस्थीती बगून सुध्धा तुमचा भावनिक राजकारण करण्यात रस आहे.