आशाताई बच्छाव
नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) यवतमाळ पुसद मुंबई ला जाणारी चिंतामणी ट्रेवल्स ची बस नाशिकच्या मिरची चौकात एका डीजल टैंकरला टक्कर बसून जागच्या जागी जळाली.घटना सकाळी ५.१५ ला झाली. बस मध्ये ११ लोकं होरपळून जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. ब-याच प्रवाश्यांनी बस मधून बाहेर उड्या मारल्या त्यांचे हात पाय मोडले व ते जखमी अवस्थेत नाशिक येथील रूग्णालयात दाखल केले आहेत. बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. पण टैंकर बस टक्कर येवढी भीषण होती की बस साठ फुट घसरत मागे गेली.टैकर ही तेवढाच मागे गेला व काही कळण्याआधीच बसने पेट घेतला. बस मध्ये दिग्रस,पुसद,वाशिम,मेहकर येथील प्रवासी होते.
शेयर करा. ८/१०/२२ सकाळी६.३०