आशाताई बच्छाव
शिक्षक देशाच्या विकासाचे हक्कदार आहेत… प्राचार्य डॉ. जगताप.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात शिक्षकांनी दिलेल्या योगदाना मुळे शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशांची चौफेर प्रगती झाली आहे. देशाच्या प्रगती मध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षक हे देशाच्या प्रगतीचे हक्कदार आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.ह.ना. जगताप यांनी मोहोळ येथे बोलताना केले
येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेच्या वतीने डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी डाॅ. प्राचार्य जगताप प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते संस्थेचे अध्यक्ष यशवंत गुंड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक संतोष गायकवाड सचिव तथा प्राचार्य सुधीर गायकवाड, शालेय समितीच्या चेअरमन रंभादेवी गुंड ज्येष्ठ संचालिका विमल गायकवाड ,सचिन गायकवाड, युवराज भोसले, संदीप गायकवाड, जानु फाटे, आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व शाखेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक यांनी केले तर अण्णासाहेब नागणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.