आशाताई बच्छाव
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहूर सह अंबुलगा सर्कल मधील खरीप हंगामातील पिके पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, मूग , उडीद, तुर, नगदी पीक म्हणून समजले जाणारे कापूस पीक धोक्यात असल्याने दिसत आहे.
मृग नक्षत्रात पाऊस समाधान कारक पडल्यामुळे पेरणी वेळेवर झाली, पण सतत पाऊस पडल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे दुबार पेरणी झाली.नदी-नाल्याकाठींची शेती आति पावसाने खरडून जाऊन खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, पण भरपूर कांही शेती अति मुसळधार पावसामुळे रान चवाळ धरुन सोयाबीन, मुग, उडीद पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.आता पंधरा दिवस झाले पाऊस पडत नाही,या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पावसाने दडी दिल्यामुळे नाराजी दिसून येत आहे. कुठे पाऊस पडतो तर कुठे नाही अशामुळे हाताला आलेली पिके अक्षरशः कडक उन्हामुळे सुकुन गेलेले दिसत आहे, तर काही ठिकाणी वाळत असल्याने दिसून येते,आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात आहे, प्रशासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टर पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.