आशाताई बच्छाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम “स्वच्छ व सुंदर मालगुंड” साठी सरपंच दीपक दुर्गुवळी यांचा पुढाकार रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण मालगुंड गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालगुंडमध्ये घरोघरी येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मालगुंडवासीय आतुर झाले असून मुंबई व पुणे या ठिकाणाहून चाकरमान्यांचे आगमनही यंदा मोठ्या संख्येने होणार असल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
या अनुषंगाने मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्या मालगुंड ग्रामपंचायतीमार्फत गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई मोहीम हाती घेऊन मालगुंडमधील सर्व मुख्य व उपरस्ते स्वच्छ व सुंदर करून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व चाकरमान्यांच्या स्वागतासाठी आपली कार्यतत्परता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मालगुंड गाव स्वच्छ होऊन सुंदर व चकाचक दिसणार आहे.
एकूणच, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण मालगुंडवासीय आतुर झाले असून मालगुंड ग्रामपंचायतीने गणेशोत्सवापूर्वी साफसफाई मोहीम हाती घेतल्याबद्दल सर्व स्थानिक ग्रामस्थ व गणेश भक्तांमधून मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी व ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील यांच्या स्तुत्य निर्णयाचे विशेष कौतुक होत आहे.