आशाताई बच्छाव
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३६५ / २०१९ भा.दं.वि.सं.क. ३७९ मधील फिर्यादी सौ. पल्लवी विजय ओरपे (रा. करबुडे, ता. रत्नागिरी ) यांचा १,७१,२२०/- रु. किंमतीचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने त्यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच या उपक्रमाअंतर्गत सायबर पोलीस ठाण्याकडुन हस्तगत केलेले एकुण ४० मोबाईल हँडसेट मुळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी मुद्देमाल परत मिळालेल्या लोकांनी आपले मनोगत व्यक्त करून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मुद्देमाल परत मिळविण्यासाठी जे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मेहनत घेतली अशा सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी विभाग सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक (गृह) मारुती जगताप, पोलीस निरीक्षक स्थागुशा हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासणे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर आदी उपस्थित होते.