आशाताई बच्छाव
चांदवड/मनमाड,(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक 16 ऑगस्ट अंकाई किल्ल्यावरील तळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे हे दोन्ही युवक अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव धरणगाव रोडच्या असल्याची माहिती समोर आली आहे मिलिंद रवींद्र जाधव वय 20 व रोहित पिंटू राठोड वय 14 राहणार कोपरगाव धरणगाव रोड असे मृत्यू युवकांचे नाव आहे श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते तर पर्यटन स्थळ असल्यामुळे बरेच तरुण आनंद लुटण्यासाठी येतात या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अगस्ती मुनींच्या दर्शनाला आलेल्या हे दोघे युवक तळ्यात आंघोळीसाठी गेले होते त्यातील एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असताना दुसरा त्याला वाचवण्यासाठी गेला तोही पाण्यात बुडाला यात दोघांचा बुडून मृत्यू झालेची दुर्दैवी घटना घडली किल्ल्यावरील असलेल्या काही जणांना याची माहिती मिळताच त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरिकांना याची माहिती दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला






