Home नाशिक नांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,

नांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,

117

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0008.jpg

नांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,

नांदगांव प्रतिनिधी अनिल
– नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता “आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा ” या आशयाचे फलक लावत काही दिवसापूर्वी सर्वाचे लक्ष वेधले होते. रेल्वे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी आज दि. १६ अॉगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नांदगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथे धरणे आदोलन करण्यात येणार आहे. नांदगावकरांनी उपस्थित राहुन गाड्या थांबा मिळून देण्याकरीता सहभाग नोंदविण्यास सांगण्यात आलेले आहे. नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी या शांततामय व कायदेशीर आदोलन असेल, तहसिलदारांना दिलेल्या परवानगीच्या पत्रात विनंती करण्यात आलेली आहे. सर्व गाड्याचा थांबा नसल्याने यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे होल होत आहे. विकासात रेल्वे गांड्याचे थांबे महत्वाचे तरच शहराची कनेक्टीविटी वाढते, यामुळे प्रगती चालना मिळते असते. प्रवाशी ही रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे , नांदगावकर अशी मागणी करत आहे .‌ रेल्वे थांबा मिळावा यासाठी शहरात बॅनरबाजी , रिक्षाला भोंगा लावून‌ नांदगावकरांना माहिती दिली जात आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. नांदगावकर बाकी गाड्यासाठी मागणी लावून धरत आहे. प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे . मी नांदगांवकर बबलु सैय्यद हे आमच्या प्रतिनिधी बोलताना नांदगावकर मागणीसाठी काय भूमिका मांडतात यासाठी धरणे आदोलनांकडे बघितले जात आहे.

Previous articleपंढरपूरात चंद्रभागेची पातळी वाढली              घाटापर्यंत बुडणाऱ्या महिलेला वाचविले
Next articleरात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.