आशाताई बच्छाव
मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजच्यावतीने “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत प्रभात फेरी
रत्नागिरी ,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शाळा ते मालगुंड बाजारपेठ अशी प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय, स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाचा विजय असो, अशा स्वातंत्र्यपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांबरोबर परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा यावेळी तेवढाच उत्साह व जोश होता.
प्रशालेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे ही प्रभात फेरी. या प्रभातफेरीत प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक सहभागी झाले होते.