Home गडचिरोली भाजपा आदिवासी आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मेळाव्याचे...

भाजपा आदिवासी आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन तर अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची उपस्थिती.

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0070.jpg

भाजपा आदिवासी आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न.

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन तर अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची उपस्थिती.

विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

ब्रह्मपुरी /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):

भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी चंद्रपूर जिल्हा व ब्रह्मपुरी तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भूज येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या सन्मानार्थ भाजपाचा भव्य आदिवासी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले. तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, भाजप नेते प्रा. अतुलभाऊ देशकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एड. हरीश गेडाम,आदिवासी आघाडी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे महामंत्री कैलास कुमरे, आदिवासी आघाडी गडचिरोलीचे महामंत्री ईश्वरजी कुमरे,सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक महादेव सिडाम उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान करून देशातील बारा करोड आदिवासी समाजाचा सन्मान केला असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी यावेळी केले. पुढे बोलतांना केंद्र सरकार द्वारा सुरू असलेल्या योजनांमध्ये सर्वाधिक लाभार्थी आदिवासी असल्याचेही खासदार अशोक नेते यांनी यावेळी उपस्थित जनतेला व कार्यकर्त्यांना सांगितले.

भारतीय जनता पार्टी कधीही जाती-पातीचे-धर्माचे राजकारण न करता प्रत्येक प्रवर्गातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने काम करते हे द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपतीपदी विराजमान करून भाजपाने स्पष्ट केले.असे प्रतिपादन माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. आता केंद्रात व राज्यात नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमाला प्रकाश गेडाम, संजय गजपुरे, हरीश गेडाम, कैलास कुमरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या मेळाव्यात माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला यामध्ये आक्सापुर व कोसंबी मधील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीच्या वतीने याप्रसंगी भूज व आक्सापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना राष्ट्रपती द्रौपदीचे मुर्मु यांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रम्हपूरी तालुका ग्रामीण रामलाल दोनाडकर यांनी केले तर आभार ज्येष्ठ नेते प्राचार्य अरुण शेंडे यांनी मानले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, माजी सभापती वंदना शेंडे, भाजपा जिल्हा सचिव माणिक पा. थेरकर,प्रकाश नन्नावरे माजी पं. स. सदस्य, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, पुंडलीक पा. झोडे, माजी जि.प सदस्य शंकर सातपुते, युवा नेते यशवंत आंबोरकर, भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष प्रा. अशोक सालोटकर, देवराव नन्नावरे उपसरपंच मुई, ज्ञानेश्वर दिवटे,अविनाश मस्के, विलास वाकुडकर,सरपंच उमेश घुले, सौ शालुताई रामटेके, सरपंच भुज, सौ. निराशा तोडफोड,सरपंच आक्सापूर, सौ. जयश्री दोडके सरपंच गोगांव, धीरज पाल यांच्या सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशिंदे सरकार मंत्रीमंडळ
Next articleअहेरी तालुक्यातील अनेक गावांना जूनपासून धान्याचा पुरवठा नाही..!! रास्तभाव दुकानांमध्ये धान्य पोहोचले नाही..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here