आशाताई बच्छाव
खंडाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा प्रशालेच्यावतीने शनिवार दि. ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत भागशाळा खंडाळा ते खंडाळा नाका अशी प्रभातफेरी काढण्यात आली. नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडाशिक्षक, सांस्कृतिक विभाग, आणि सर्व शिक्षक यांच्या नियोजनाप्रमाणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माझा तिरंगा… माझी शान, भारत माता की जय! अशा घोषणांनी यावेळी येथील परिसर दुमदुमून गेला होता.