आशाताई बच्छाव
रघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. काल रविवार 5 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील सुमारे 21 गावांचा खेड तालुक्याशी संपर्क तुटला होता.
आतापर्यंत या रघुवीर घाटात 3 वेळा दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बाजारहाटसाठी खेडकडे येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 21 गावांचा संपर्क तुटतो. काही दिवसांपूर्वी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल 36 तासांचा अवधी लागला होता. आता पुन्हा एकदा घाटात दरड कोसळली आणि हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला. घाट बंद झाल्याने या खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा संपर्क पुन्हा एकदा तुटला. दरड कोसळल्याची बातमी मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मदतीने दरड काढण्याचे काम सुरु केले आहे. मात्र मुसळधार पाऊस असल्याने दरड बाजूला करण्यात अडथळे येत होते. उशिरा ही दरड बाजूला करण्यात आली.