आशाताई बच्छाव
राजश्री शाहू समाधी स्थळाचा निधी रोखल्याबद्दल कोल्हापुरात शिवसेनेने असा केला शिंदे सरकारचा निषेध.
कोल्हापूर राहुल शिंदे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शाहू समाधी स्थळ विकासासाठी दहा कोटी चाळीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. आताच्या शिंदे फडणवीस सरकारने आधीचे सर्व निर्णय रद्द केल्याने समाधी स्थळासाठी मंजूर झालेला निधी देखील थांबला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज स्वाभिमानी जनतेचे स्वाभिमानी निधी संकलन आंदोलन करण्यात आलं. दुपारी साडेबारा वाजता बिन खांबी गणेश मंदिरापासून या निधी संकलन फेरीची सुरुवात झाली. शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचा निधी थांबवणे हा छत्रपती शाहुंचा अवमान असून सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही जनतेकडून पैसा गोळा करून शिंदे फडणवीस सरकारला देऊ, अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. आताच्या सरकारनं महाविकास आघाडी सरकारचा निर्णय पूर्ववत केला नाही तर येत्या 15 ऑगस्ट ला कोल्हापुरात कडकडीत बंद पाळू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. ज्यांना गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे आहेत, सुरतला जाण्यासाठी पैसे आहेत, गोव्यात चैनी करण्यासाठी पैसे आहेत, चार्टर्ड प्लेन मधून फिरण्यासाठी पैसे आहेत, सत्तेसाठी पैसे आहेत, त्यांच्याकडे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी पैसे नाहीत लाजिरवाणी गोष्ट आहे असा घनाघात पवार यांनी केला.
. या निधी संकलन फेरीमध्ये जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत, मंजीत माने, विशाल देवकुळे, अवधूत साळुंखे, आसिफ शेख, कमलाकर जगदाळे, सरदार चिठे, स्वरूप मांगले यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेतला.