Home रत्नागिरी अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे, या हल्ल्यानं...

अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे, या हल्ल्यानं मी घाबरणार नाही.शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही -आमदार उदय सामंत

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0017.jpg

अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे, या हल्ल्यानं मी घाबरणार नाही.शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही -आमदार उदय सामंत     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर आज शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात मोठा राडा झाला.राड्यानंतर उदय सामंत कोथरुड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सामंतांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मागचे काच पूर्णपणे फुटले आहेत.

घटनेच्या वेळी प्रचंड मोठा राडा झाला. याच हल्ल्याचा थरार उदय सामंत यांनी सांगितला. “माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला थांबल्यामुळे मी कुठेही घाई न करता थांबलेलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येवून थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस वॉलची स्टिक होती. तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता.

मला ते येवून समोरुन शिव्या घालत होते. तर दुसऱ्या बाजूला 50 ते 60 लोकांचा मॉब होता”, असं उदय सामंत यांनी सांगितलं. “मी डाव्या बाजूला बघितलं, जेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होते त्यांच्या हातात सळई होते. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना शूटिंग करायला सांगत होते.

त्यांनी शिवीगाळ करुन गाडीवर चढून मारण्याचा प्रयत्न केला”, अशी धक्कादायक माहिती उदय सामंत यांनी दिली. “शिवसैनिकांचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की, त्यांनी त्यांचा ताफा अडवला तर ते धादांत खोटं आहे. माझ्याकडे काही फोटो आहेत. हे फोटो मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतो. हातात बघा काय आहे. शिवसैनिक अशाप्रकारच्या सभांना हत्यारं घेवून जात असतील तर ती सभा म्हणावी का? हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलं पाहिजे”, असं उदय सामंत म्हणाले.

अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ठेचून काढली पाहिजे. या हल्ल्यानं मी घाबरणार नाही.राज्यात कशी गुंडाशाही आहे, हे राज्यात सांगणार आहे, असे ते म्हणाले. पुढे म्हणाले, ‘मला पोलिसांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी माझा जीव वाचवला. माझी गाडी सिग्नलला थांबली असताना हा भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे उदय सामंत शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही. ही साथ अधिक मजबूत होणार आहे. माझ्या मतदार संघाच्या आर्शीवादाने, आई-वडिलांच्या पुण्याईनं या भ्याड हल्ल्यातून मी वाचलो आहे. मी याबाबत पोलिसांना सांगितले आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here