आशाताई बच्छाव
फरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
पिंगळवाडे येथील करंजाडी नदी पात्रात फरशी पूल नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पिंगळवाडे येथे करंजाड ते मुंगसे रस्ता लगत लांगी शिवारात साधारण वीस ते पंचवीस शेतकरी वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना करंजाडी नदी पात्रातून प्रवास करावा लागत आहे. जर नदीपात्रास पाण्याचे प्रमाण जास्त राहिले तर या शेतकऱ्यांना मुख्य रस्त्याचा संपर्क कायम तुटत असतो. तसेच नदीपात्रातील पाणी कमी होईपर्यंत शाळकरी मुलांना घरीच थांबावे लागते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुख्य रस्त्याला आणणे अवघड होत आहे. अशा अनेक गैरसोयी मुळे या परिसरातील शेतकऱ्यांना या नदीपात्राच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासकीय पातळीवर सूचना दिल्या आहे परंतु याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी मंजूर झाला आहे परंतु हा निधी या पुलाच्या कामासाठी अपुरा पडत असल्याने हा फरशी पूल पूर्ण होऊ शकत नाही तसेच लोकप्रतिनिधींनी स्थानिक शेतकऱ्यांना नुसता आश्वासनाचे आमीष दाखवून आपली सोय करून घेतली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार जर करंजाडी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालीच तर आम्हाला रात्री अपरात्री मुख्य रस्त्याला येणे फार गैरसोयीचे होत आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा ही विनंती.
साधारण वीस ते पंचवीस वर्षापासून ची आमची मागणी आजही प्रलंबित आहे. तरीसुद्धा लोकप्रतिनिधी शासन दरबारी याबाबत लक्ष देण्यात यावे.
गिरीश भामरे.
स्थानिक शेतकरी