Home नाशिक फरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.

फरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0026.jpg

फरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
पिंगळवाडे येथील करंजाडी नदी पात्रात फरशी पूल नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पिंगळवाडे येथे करंजाड ते मुंगसे रस्ता लगत लांगी शिवारात साधारण वीस ते पंचवीस शेतकरी वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना करंजाडी नदी पात्रातून प्रवास करावा लागत आहे. जर नदीपात्रास पाण्याचे प्रमाण जास्त राहिले तर या शेतकऱ्यांना मुख्य रस्त्याचा संपर्क कायम तुटत असतो. तसेच नदीपात्रातील पाणी कमी होईपर्यंत शाळकरी मुलांना घरीच थांबावे लागते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुख्य रस्त्याला आणणे अवघड होत आहे. अशा अनेक गैरसोयी मुळे या परिसरातील शेतकऱ्यांना या नदीपात्राच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासकीय पातळीवर सूचना दिल्या आहे परंतु याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी मंजूर झाला आहे परंतु हा निधी या पुलाच्या कामासाठी अपुरा पडत असल्याने हा फरशी पूल पूर्ण होऊ शकत नाही तसेच लोकप्रतिनिधींनी स्थानिक शेतकऱ्यांना नुसता आश्वासनाचे आमीष दाखवून आपली सोय करून घेतली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार जर करंजाडी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालीच तर आम्हाला रात्री अपरात्री मुख्य रस्त्याला येणे फार गैरसोयीचे होत आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा ही विनंती.

साधारण वीस ते पंचवीस वर्षापासून ची आमची मागणी आजही प्रलंबित आहे. तरीसुद्धा लोकप्रतिनिधी शासन दरबारी याबाबत लक्ष देण्यात यावे.
गिरीश भामरे.
स्थानिक शेतकरी

Previous articleदुचाकीवरून देशी दारूचा बॉक्स नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले
Next articleप्रविण सावंत यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे केरसाणे दसाणे ग्रामस्थानी केले कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here