Home सोलापूर विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0046.jpg

विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 31 जुलै आणि एक ऑगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळासह विविध भागात स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विठ्ठल कारखान्याच्या सर्व कामगार यांच्यासाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी दिली यावेळी शिबिराचे उद्घाटन चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन संचालक मंडळींच्या शुभहस्ते होणार आहे

सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता कारखाना स्थळावर तालुका कृषी अधिकारी महेश देवकते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचवेळी कारखाना कार्यस्थळावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शेंगेसर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रम बरोबरच सोमवारी सकाळी 930 नागनाथ मुखबधीर विघालय बाबुळगाव येथील मुलांना भोजन देण्यात येणार आहे वरील सर्व स्तुत्य उपक्रम बरोबर तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्र, कार्यकारी संचालक डी आर गायकवाड यांच्या वतीने देण्यात आली आहे

Previous articleमुखेड येथील कै. गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन.
Next articleनरसींग डुबेवाड यांचे निधन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here