Home गडचिरोली भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0034.jpg

भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी साहेब ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना भारत देशाला स्वतंत्र मिळुन ७५ वर्षे होत आहेत.१५ ऑगष्ट हा ७५ वा ऐतिहासिक दिवस असुन स्वतंत्रता अमृत महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येत आहे. “हर घर तिरंगा झेंडा” हा उपक्रम घेण्यात येत आहे.तसेच शेतकरी बांधवांनसाठी कृषी विभागाची माहिती, मानवी आरोग्य निरोगी रहावे याकरिता आयुर्वेदची माहिती तसेच भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये केलेली भरीव कामगिरी तसेच इतर विषयावर संवाद साधला असुन गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तालुका स्तरावर,शहरात,प्रत्येक बुथवर कार्यक्रम घेण्यात आले.आज भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अनिल कुनघाडकर, हरशल गेडाम,पुनम हेमके,दर्शीता पिपरे,हेमंत नंदनवार,रश्मी खरकाटे,जोत्स्ना मुरमुरवार,रिंकु मेश्राम,सुनील कोतकोंडावार,भाजपा पदाधिकारी,शक्तिकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख तसेच भाजपा कार्यकर्ते ‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी करिता उमेदवार चाचपणी ला सुरुवात
Next articleअमडापूर बस स्थानक परिसरात अनाथ यूवक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here