Home नाशिक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0030.jpg

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
चालू हंगामात उन्हाळ कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडत आहे. साधारण फेब्रुवारी,मार्च महिन्यात काढलेला कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षे शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने कांदा साठवून केला आहे.परंतु अशातच पावसाने सतत धार चालू केल्याने कांदा बाजार समितीत आणनेही अवघड झाले होते.आता पावसाने उघडीप दिली. परंतु कांदा बाजार समितीत कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने किंवा वाहन भाडे सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीक सापडला जात आहे. अशातच पावसाने भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला किंवा कांद्याचा कुठलाही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे नाराज आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच पडू आहे. अशाच नाकेड तर्फे कांदा खरेदि बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा बाजार समिती कवडीमोल घेऊन व्यापारी वर्गाकडून क्रुर चेष्टा केली जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार किमान उत्पादन खर्चाचा विचार करून कांद्याला योग्य तो भाव दिला पाहिजे हीच अपेक्षित शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत विविध संघटनांनी शासनाला वेळोवेळी सूचना दिली आहे. परंतु शासन याबाबत गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.

 

उन्हाळ कांद्यांना योग्य तो भाव नसल्याने कांदा चाळीतच पडून आहे. व तो आता पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहे. तरी शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व कांदा उत्पाद शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे धोरण जाहीर करावे.
सतीश अर्जुन भामरे
कांदा उत्पादक शेतकरी (पिंगळवाडे)

Previous articleजवाहर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांची मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Next articleराज्यपाल कोश्यांरीचे मराठी माणसाबद्दल बेताल वक्तव्य सर्वत्र निषेध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here