राजेंद्र पाटील राऊत
छत्रपती शिवाजी महाराज वाडीतील रस्त्याच्या कामात दिरंगाई का? मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क) मालेगांव महानगरपालिकेच्या निधीतून मोठा गाजावाजा करुन मोची काँर्नर ते गणेशवाडी पर्यत रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात आल्याचा दिखावा करण्यात आला.मात्र उदासीन ठेकेदार व निष्काळजीपणे वावरणारे लोकप्रतिनिधी यांच्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.त्याशिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरुन चालणे देखील मोठीच डोकेदुखी ठरत आहे.निसरडा मातीचा रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे एका व्यक्तीला पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती असतानाही भ्रष्ट ठेकेदार व निष्क्रीय लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने या भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.तरी याप्रश्नी तात्काळ कारवाईची मागणी या भागातील नागरिंकानी केली आहे.