आशाताई बच्छाव
वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मंगरूळनाथ तालुक्यातील चांबई, हिसई,पार्टी ताड व तांदळी या गावातील विद्यार्थ्यांची ऍडमिशन मंगरूळनाथ येथील शाळा कॉलेजेस मध्ये आहे. तरी त्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो व या गावातल्या फाट्यांवर महामंडळाच्या बसेस न थांबल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व त्यांना खाजगी वाहनाने जावे लागते. या परिस्थितीचा लाभ घेऊन खाजगी वाहन चालक विद्यार्थ्यांची लूट करत आहे.तसेच मर्यादिपेक्षा जास्त लोक खाजगी वाहनाने नेत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या गावातील फाटांवर महामंडळाची बस न थांबल्यामुळे एसटीचा मोठा महसूल बुडत आहे ही बाब लक्षात घेऊन चांबई, हीसई,पार्टी ताड व तांदळी या गावातील फाट्यांवर एसटी थांबवण्यात यावी व जनतेला आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे उपतालुकाध्यक्ष जतीन सोनवणे यांनी आगारप्रमुखांना केली आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष जतीन सोनवणे, मुकुल ठाकरे, पवन शिंदे, दीपक राठोड, अनुज दिवाने व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.