Home गडचिरोली राळापेठ जिल्ह्या परिषद शाळेत वीज कोसळून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी ; विठ्ठलवाडा...

राळापेठ जिल्ह्या परिषद शाळेत वीज कोसळून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी ; विठ्ठलवाडा येथील शेतकऱ्यांचे शेतिउपयोगी साहित्य जळून राख

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0022.jpg

राळापेठ जिल्ह्या परिषद शाळेत वीज कोसळून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी ; विठ्ठलवाडा येथील शेतकऱ्यांचे शेतिउपयोगी साहित्य जळून राख

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोंडपिपरी तालुक्यात मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊसाला सुरवात झाली.
विजेने तर कहरच केला. तालुक्यात दोन गावात वीज कोसळली राळापेठ येथिल जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळेवर वीज कोसळल्याने तीन विद्यार्थ्यां कीरकोळ जखमी झाल्याची घटना दि. ९ जुलै रोजी घडली ही घटना ताजी असतानाच काही वेळातच विठ्ठलवाडा शेत शिवारात चिंचेच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली ठेवलेलं सम्पूर्ण शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे चाळीस हजाराचे नुकसान झाले.

गोंडपिपरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.सकाळ पासून आकशात मेघ दाटले; अंधकार झाला. अचानक मेघ गर्जनेसह विजेचा कडकडाट सुरू झाला.
शनिवार असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सकाळी सात वाजता भरल्या.येन सुट्टी होण्याच्या वेळात दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी सुद्धा पाऊस थांबण्याची वाट बघत शाळेतच थांबले होते.दरम्यान शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. यात तिन विद्यार्थी जखमी झाले. अमर माधव राऊत,राशी विनायक ताजने , निशांत अंगुलमान उराडे
असे जखमी विध्यार्थीचे नावे आहेत. वीज कोसळल्याने शाळेतील सर्व लाईन टीव्ही,पंखे,सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याने शाळेचे लाखों रुपयाचे नुकसान झाले
तर विठ्ठलवाडा येथील पुंजाराम पिपळकर यांच्या शेतातिल चिंचेच्या झाडावर वीज कोसळली
झाडालगत झोपडीत ठेवलले २० पाईप , २० खत बॅग ,गुरांचे खाद्य यासह शेतिउपयोगी सर्व साहित्य जळून राख झाल्याने ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून
नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Previous articleसोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत – कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले
Next articleतीर्थक्षेत्र मूल्हेर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here