आशाताई बच्छाव
पिंगळवाडे परिसरात सकाळ पासून संततधार
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सकाळपासून पिंगळवाडे व परिसरात संततधार सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण.
जून महिन्यात साधारण दोन वेळा चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत पेरणीचे काम पूर्ण केली होती. तसेच पेरणी ही शंभर टक्के पूर्ण झाली होती. पण मात्र अचानक पावसाने उघडीत दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. दुबार पेरणीची संकट येईल की काय असे वाटू लागले होते. त्यातच विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया जातील अशी शंका होती. परंतु दिनांक ८.७.२०२२ रोजी सकाळी पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. तसेच या पावसाचे स्वरूप संथधार असल्याने हा पाऊस विहिरींसाठी व पिकांसाठी उपयुक्त असा ठरत आहे. या पावसामुळे डोंगर माध्यावर गवताचे प्रमाण वाढेल त्यामुळे पाळीव प्राण्यांचा तुर्तास चाऱ्याचा प्रश्न मिटेल. शेतकऱ्यांना मध्ये एकीकडे पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे.परंतु या खरीप हंगामाच्या पिकांसाठी लागणारे रासायनिक खतांची कृत्रिम टंचाईला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने या कृत्रिम खंत टंचाईला आळा घातला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही असे बहुतांशी शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. संबंधित रासायनिक खत विक्रेत्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की संबंधित खत निर्मित करणाऱ्या कंपन्या यांच्याकडुन योग्य असा खत पुरवठा होत नसल्याने परिणामी आमच्याकडेही खत साठा शिल्लक राहत नाही. त्यामुळे परिणामी आमच्याकडून शेतकऱ्यांना खत पुरवठा होत नाही.