आशाताई बच्छाव
रस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणी मोठे गतिरोधक तसेच सुरक्षा पत्रे बसवावेत परीसरातील नागरीक तसेच ग्रामस्थांनी केली मागणी
वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – येथील गावाच्या मध्यभागात मोठे वळण असुन या ठीकाणी समोरून येणारे कुठलेही वाहन दिसत नाही,सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा बसावा म्हणुन अशा ठिकाणी मोठे भयानक अपघात होण्याची देखील दाट शकता असुन , सदरील ठीकाणी अशी भयानक परस्थिती उद्भभवल्यास जिवित हानी होवु शकते ,या साठी परीसरातील नागरीकांनी मोठे गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे,जेणेकरुन अपघात होणार नाहीत,हा रस्ता सरवड फाटा ते ब्राम्हणवेल गावांपर्यंत असुन येथे धुळ्याकडुन सुरत च्या मार्गाने व सुरत कडुन धुळ्याच्या या मार्गावर मोठी वाहतुक सुरू असते,तरी अवजड व लहान मोठे वाहतुकीला आळा बसावा व आपघात टळावा ही भुमिका नागरीकांची आहे,मागील वर्ष भरात निजामपुर ते वासखेडी या ठिकाणीं बरेचसे मोठे अपघात झाले आहेत परीणामी अपघातांत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे,तसेच याच रस्त्यावरील कडेलाच लहान बालकांची अंगणवाडी देखील आहे ,परंतु रस्त्याची सुरक्षा बघता कुठलाही सुरक्षा पत्रा या ठिकाणीं नसुन या परीसरात बालकांचा गदारोळ देखील असतो, तसेच गावातील सुरक्षात्मक विचार करून योग्य त्या जागेवर सुरक्षा पत्रे तात्काळ बसविण्यात यावे ,अशी मागणी देखील वासखेडी ग्रामस्थ तसेच परीसरातील नागरीक करतांना दिसतात,
जर वरील मागणींवर प्रशासनाने लक्ष न दिल्यास आपघातास कारणीभुत कोण अशी चर्चा होतांना दिसते