Home गडचिरोली मुंबईत राहूनही आमदार डॉ देवरावजी होळी घेतात आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी

मुंबईत राहूनही आमदार डॉ देवरावजी होळी घेतात आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0039.jpg

मुंबईत राहूनही आमदार डॉ देवरावजी होळी घेतात आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी

रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना स्वतः फोन वरून देतात निर्देश

गंभीर असणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आपल्या स्विय सहाय्यका मार्फत घेतात काळजी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या योग्य सोयी सुविधा नाहीत त्यामूळे आपल्या रुग्णाला चांगली सेवा मिळावी याकरिता रुग्णांचे नातेवाईक नेहमीच आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याशी संपर्क करून चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांना फोन करावे अशी मागणी करतात. मात्र साहेब मुंबईला आहेत हे कळल्यावर आपल्या रुग्णांवर चांगले उपचार कसे होतील याची चिंता व्यक्त करतात.मात्र आमदार डॉ देवरावजी होळी हे जरी मुंबईत असले तरीही ते आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी प्राथमिकतेने घेवून रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना फोन वरून देतात निर्देश

एवढेच नाही तर गंभीर असणाऱ्या रुग्णांवर तातडीनं उपचार मिळाले पाहिजे त्यांचा जीव वाचला पाहिजे यासाठी आवश्यक त्या ठिकाणीं आपल्या स्विय सहाय्यकाला प्रत्यक्ष रुग्णालयात पाठवून रुग्णांची काळजी घेतात

या आठवड्यात आमदार डॉ देवरावजी होळी मुंबई येथे आहेत तरीही त्यांनी आपल्या रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी प्रयत्न करुन रुग्णांना धीर दिला व उपचार करवून घेतले याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार महोदय यांचे आभार मानले आहे

Previous articleजबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा. खा.अशोकजी नेते.
Next articleराजीनामा दिलाच..! ठाकरे सरकार बरखास्त..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here