Home नांदेड बिल्लाळी सेवा सोसायटी चेअरमन पदाची निवड जाहीर ! •] चेअरमन पदी पॅनल...

बिल्लाळी सेवा सोसायटी चेअरमन पदाची निवड जाहीर ! •] चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव इंगळेची वर्णी

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0013.jpg

बिल्लाळी सेवा सोसायटी चेअरमन पदाची निवड जाहीर !

•] चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव इंगळेची वर्णी

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील बिल्लाळी सेवा सहकारी सोसायटीकडे लक्ष लागून राहिलेल्या चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव बापुराव पाटील कदम तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव मोहनराव इंगळे यांची एकमताने निवड जाहीर.

मुखेड तालुक्यात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बिल्लाळी सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकूण १३ जागे पैकी एकजागा बिनविरोध तर १२ जागेच्या अट्टातटीच्या निवडणूक लढतीत अच्युतराव पाटील यांचे १२ उमेदवार बहुमताने निवडून आले होते.तर दुसरीकडे मात्र माजी जि.प. तसेच चंद्रकांत घाटे यांचा दारुण पराभव झाला होता.

चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र १५ जुन रोजी निवड प्रक्रिया पार पडुन चेअरमन पदी अच्युतराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव मोहनराव इंगळेची निवड झाल्याबद्दल मुखेड पंचायत समिती सदस्य जे.बी. कांबळे , टीव्ही सह्याद्री न्युजचे पत्रकार विठ्ठल पाटील येवतीकर , पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून या निवडीबद्दल चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सर्व स्थरातुन कौतुक केले जात आहे.

Previous articleभारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
Next article▪️स्वातंत्र्य दिनानिमित्त 11 ते 17 ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here