आशाताई बच्छाव
थकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद
रविंद्र शिरस्कार/युवा मराठा न्युज नेटवर्क
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण जळगांव जामोद यांचा दिनांक 4मे 2022 तसेच 10 जुन 2022 च्या आदेश,सूचनेनुसार सदर योजनेचे 32लाख,18हजार रुपये बिल थकीत असल्यामुळे 140 गाव योजनेचा पाणीपुरवठा हा आज दि 21जून पासून बंद करण्यात आला आहे तरी गावातील सर्व ग्रामपंचायत खातेदारांना ग्रामपंचायत कार्यालय वानखेड कडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे सदर वानखेड गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील रेकॉर्ड नुसार आजवर 37लाख 20हजार रुपये एवढी रक्कम गावातील सर्व खातेदार यांच्या कडील थकीत बाकी आहे तरी सर्वांनी बाकी असलेला हा घरकर तसेच पाणिकर त्वरित भरणा करून सहकार्य करावे व होणाऱ्या गैरसोय पासून सावध व्हावे.
करिता ग्राम विकास अधिकारी धनवाडे साहेब ,सरपंच, उपसरपंच यांच्या मार्फत आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे