Home कृषिसंपदा अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार

अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार

97
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0039.jpg

अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चिफ बीरों महादेव घोलप.

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यावेळी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले.
आता 11 वा हफ्ता कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम २-२ हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क :-
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

Previous articleशेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘या’ महिन्यात मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
Next articleसावली येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी सहकारी पँनल चा विजय।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here