राजेंद्र पाटील राऊत
शासन निर्णयाची अंमलबजावणी करून जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा
आमदार डॉ देवरावजी होळी
आमदार देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत पेंढरी येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
शासनाने जनतेच्या हितार्थ अनेक शासन निर्णय घेतले परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयांची अंमलबजावणी करून लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी पेंढरी येथील महाराजस्व अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले
यावेळी तहसिलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी कोमलवारजी , पेंढरीचे सरपंच पप्पू येरमे, आरोग्य, महसूल ,कृषिसह विवीध विभागांचे अधिकारी , व मान्यवर मंचावर उपस्थित होते
सरकारने जनतेच्या हिताकरिता अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. वर्ग २ ची जमीन वर्ग१ करणे ,शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणी पत्र करून घेणे, शेतकऱ्यांची खातेफोड करणे ,यासह महसूल विभागातील विविध योजनांचा सहभाग आहे परंतु राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन नेतृत्वामुळे तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भावनेमुळे अजून पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शासन निर्णयांची अंमलबजावणी करून लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी या महाराजस्व अभियानाच्या प्रसंगी केले. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते विवीध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.